दिल्लीत जागर मराठीचा… संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा….
एक अपूर्व योग जुळून आलाय… आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन `सरहद, पुणे`च्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार व्हा… त्यात सहभागी व्हा!
अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणे
देशाच्या राजधानीत यंदा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषेचा गजर आणि साहित्यिक जागर होणार आहे. ही बाब माझ्यासारख्या मराठी साहित्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची आहे.
श्री. देवेन्द्रजी फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
देशाच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनातून मराठीला ज्ञानभाषा बनविण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा व्हावा, हीच अपेक्षा. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा.
श्री. नितीनजी गडकरी
मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग, भारत सरकार
महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वरूपात ह्या वर्षी देशाच्या राजधानीत साजरा होत आहे. ह्या संमेलनानिमित्त विविध ठिकाणाहून एकत्र येणारे सर्व साहित्यिक, संशोधक, अभ्यासक, मराठी भाषक आणि मराठी-भाषा-प्रेमी ह्यांचे ह्या मराठी भाषेच्या साहित्योत्सवात सविनय स्वागत आणि मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री. उदयजी सामंत
मंत्री, मराठी भाषा आणि उद्योग. महाराष्ट्र राज्य
मराठी भाषा ही साहित्याचा प्राण आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि अस्मितेविषयी सकारात्मक चर्चा झाल्यास ते संवादाचे फलित ठरेल.
श्री. विनयजी सहस्रबुद्धे
माजी खासदार
दिल्लीचा आणि मराठ्यांचा संबंध फार जुना आणि दृढ आहे. हे जुने बंध लक्षात घेता आता स्वातंत्र्योत्तर काळात, तिथे आपली खूण, ओळख असायला हवी. तिथे आपली भाषा, संस्कृती पोहोचली पाहिजे. त्या दृष्टीने दिल्लीत होत असलेले अ.भा. मराठी साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह अशी घडामोड म्हणता येईल.
डॉ. सदानंद मोरे
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलन, घुमानचे अध्यक्ष
टीप: वरील कार्यक्रमांमध्ये आयोजकांकडून बदल केले जाऊ शकतात.